माझ्या मनाचा शोध

Thursday, June 14, 2007

तब्बल एक वर्षापूर्वी मी ही नोंदनिशी लिहायला घेतली. सवयीप्रमाणे सुरुवातीचा उत्साह टिकला नाही आणि एक वर्ष उलटून गेलं. आता परत लिहिण्याची गरज भासली तेंव्हा परतून आले. माझ्या या खरडण्याला आता तरी थोडा नियमितपणा यावा अशी आशा आहे. हा नियमितपणा काही अंशी लिहिण्याच्या गरजेवरही अवलंबून असतो (दुष्टचक्र), तेंव्हा वेळोवेळी जे तुटपुंजे वाचक आहेत ते मला त्यांचं हे खरडणे वाचायच्या गरजेनुसार उकसवतील ही आशाही जाताजाता व्यक्त करते.

असो, तर माझ्यावर लिहिण्याचा प्रसंग यावाच का? कारण असे की माझ्या एका मित्राने एक लेख वाचावा अशी शिफ़ारस केली. आणि मीही आलिया भोगासी अश्या पवित्र्याने तो वाचायला घेतला ( येथे माझ्या मित्राने राग मानू नये, हे वैयक्तिक ताशेरे नसून, रात्रीचे ९ वाजले ही वस्तुस्थिती मला असं लिहायला प्रवृत्त करते आहे) . या लेखाचं शीर्षक होतं 'बाप'. बरं आता थोडं गंभीर व्हायला हवं. हा लेख मी वाचकांच्या संदर्भासाठी इथे छापत आहे.

" बाप

आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलेलं आहे का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहीलं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्व अधिक सांगितलेलं आहे. देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतूक केले आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते. पण बापाच्या विषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात एक दोन टक्के बाप असे असतीलही. पण चांगल्या वडिलांबद्दल काय?आईकडे अश्रूंचे पाट असतात. पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यांवरच जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना! पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं! रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो.आई रडते. वडिलांना रडता येत नाही. स्वत:चा बाप वारला तरी रडता येत नाही. कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरीही रडता येत नाही कारण बहीणींचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावरच साथ सोदून गेली तर पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याचवेळेस शहाजी राजांची ओढाताण सुध्दा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतूक अवश्य करावं पण पुरातुन पोराला डोक्यावर घेवून जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण वियोगाने तडफडून मरण पावला तो पिता दरशथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहीलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियन पाहीली की कळतं "आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत" त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो.मुलीला गाऊन घेतील. मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पॅंट वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये वीस-पंचवीस रूपये खर्च करतो. मुलगी ब्युटी पार्लरमध्ये तीसेक रूपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरडत असतो. अनेकदा तो नुसतं पाणी लावून दाढी करतॊ. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही. पण डॉक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याला भिती वाटते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकलला, ईंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढताण सहन करून त्या मुलाला दरमहिन्याला पैसे पाठ्विले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात आणि ज्या बापांनी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात. एकमेकांच्या बापाच्या नावानी एकमेकाला हाका मारतात.आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेनं कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काहीही करत नसला तरीही तो त्य पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो. सांभाळत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही. पण बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई होण्याला बापामुळे अर्थ असतो.कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतूक करते. पण गुपचुप जावून पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिलटकरणीचं खूप कौतूक होतं पण हॉस्पीटलच्या आवारात अस्वस्थपणे वावर्णाऱ्या त्या बाळाच्या बापाची कोणीही दखल घेत नाही.चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई गं हा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्र्क जवळ येवून ब्रेक अचानक लावतो तेव्हा "बाप रे" हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठीमोठी वादळं पेलताना बापच आठवतो..... काय पटतय ना? delete कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात. पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो. पण गरीब मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरूण मुलगा उशीरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलींच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वत:च्या व्यथा दडपणारा बाप..... खरंच किती ग्रेट असतो ना?वडिलांच महत्व कोणाला कळतं ? ..... लहानपणीच वडिल गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एकेका वस्तूंसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलतांना बापाचा बदललेला आवाज एका क्षणांत कळतो, मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वत:च्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेंव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते इतरांनी सुध्दा असंच आपल्याला जाणांव हीच बापाची किमान अपेक्षा असते."


आई-वडिलांमध्ये चढाओढ असते हे मला माहित नव्हतं, खरंच असते का? ही नाती इतकी उथळ असतात का हो? त्यागाचे निकष, प्रेमाचे निकष कशासाठी लावायचे? प्रेम कसं व्यक्त करावे ते माणसाची प्रकृती ठरवते. इथे इच्छा नसूनही Ayn Rand मधील संदर्भ द्यावासा वाटतो. ती त्यागाची अतिशय सुंदर व्याख्या करते. त्याग केला हे सांगावं लागत असेल तर मग तो त्याग नसतो, तो समजून घ्यावा लागतो. तेंव्हा त्याग आणि प्रेम ह्या तर परस्परावलंबी भावना, एकमेकांना पूरक, एकीखेरीज दुसरी निरर्थक होते!

आई आणि बाबा ह्या भौतिकद्रुष्टया दोन व्यक्ती असतात, पण माझं अस्तित्वच त्यांचं अद्वैत सिद्ध करत नाही का? दोन रूपं दिसतात, आणि गोंधळ उडतो. एक मायाळू तर दुसरं परखड. एक कोडग्या समाजात जवळ घेऊन आधार देणारं तर दुसरं त्याच कोडग्या समाजाला सामोरं जाऊन तोंड देण्याची ताकद देणारं. नुकताच गायत्री नातुंच्या शब्दलुब्ध या नोंदनिशीवर एक पु.लं. आणि सुनीताबाईंवरचा एक लेख वाचला. हा लेख माझं मत अधिक परिणामकारकरित्या मांडतो.

http://shabdalubdha.blogspot.com/2006/03/blog-post.html

कोणी संसार सांभाळताना किती अधिक कष्ट घेतले याचा हिशोब ठेवण्यासारखं हे नातं नाही, तो ठेवावा लागत असेल, तर कुठेतरी काहीतरी चुकतंय हे समजावं! संसाराचं संतुलन बिघडलं की हे प्रश्न पडतात. आता संतुलन का बिघडतं याला सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक कारणं असू शकतात, त्यांत पडलं तर विषयांतर होईल असं वाटतं.

आईचं कौतुक वडिलांचं कर्तृत्व झाकोळतं असं वाटत असेल तर आपला द्रुष्टीकोण कोता आहे समजावं. स्त्रियांना परंपरेनुसार व्यावसायिक exposure नसायचं. वडिलांना कचेरीतल्या बढत्या असतात, professional challenges चं thrill असतं. स्त्रियांना कर्तृत्व कशात दाखवायचं हा choice नसतो ( किंवा नसायचा). घरात सगळे जेवल्यावर जेवणारी आई विसरता येते का? स्वत:च्या ताटातून काढून आपल्याला देणारी आई कशी विसरता येईल बरं? आणि हो, आज व्यावसायिक स्वातंत्र्य लाभलेलं असलं तरी आई ही आईच राहते. नवऱ्याच्या बरोबरीने पैसे मिळाले तरी ती शेवटीच जेवते. आपलं अस्तित्व विसरून नवं नाव घेऊन, नव्या घरात राहणं आणि आपलं अस्तित्व कळूही न देता सामावून जाणं, यात कर्तृत्व असतं.
शेवटी कर्ता पुरुष असंच समाज म्हणतो ना? मग आईच्या कर्तृत्वाचं हे असंच वेगळ्या मार्गांनी कौतुक करावं लागतं!

स्त्री आणि पुरुष यांना निसर्गाने काही देणग्या दिल्या आहेत, ज्या एकमेकांना पूरक असतात. त्यांचे वैयक्तिक फ़ायदे आंणि तोटे असतात. त्यांचा जमाखर्च मांडला तर कधीच पूर्ण व्हायचा नाही. नाती दुरावतील आणि मनात अढी तेवढी निर्माण होईल.

5 Comments:

  • At 12:17 AM, Blogger Nandan said…

    varShapoortinimitta abhinandan. lekh aani sandarbhasathi dilele duve chhaan aahet. baryach divasanni pu-lancha lekh punha vaachala, bare vaatale. pudheel lekhanasathi mana:poorvak shubhechchhaa.

     
  • At 11:56 AM, Anonymous Anonymous said…

    अद्वैताची कल्पना आवडली. . .उच्च!

    चंगोंच्या चारोळीच्या काही ओळी. . . .

    घर दोघांचं असतं. .दोघांनी सावरायचं असतं
    एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. . .

    आईशप्पत बाप पोष्ट आहे. . .:)

     
  • At 12:22 PM, Blogger Yadnyesh said…

    Hi

    I read your blogs. Views regarding place of male and female in the family are mature and appreciable, as they are not muddied in Indian traditionalism or feministic hunger for domestic power.

    Some comments on Indian History – History does make us learn from our past mistakes but is not limited to it. India was one of the most developed civilizations before 1100 AD in spiritual as well as material sense. This success story we should be learning from our history. It also gives the sense of identity to the nation and hence people of that nation. As human experiences shape the human character, history shapes nation’s culture.

    It is absolutely undeniable that the history the way we learn in our schools aim at glorification of some national heroes while systematically hiding their limitations. Nathuram Godse is mentioned in our history texts as – “mathefiru”; systematically ignoring his point of views. So history texts fail to teach us from our mistakes and somewhat fulfill rest of the objectives of studying history.

    Gandhi did a lot of mistakes in his political career that costed us a lot (though I am a Gandhist!). You have mentioned many of them in your blog. Agreeing to partition, in my opinion was need of the situation. Though religious split in Indian society and politics could have been prevented, its seeds (hence seeds of partition) were sown long before the partition. Partition was just its consequence.

     
  • At 2:11 PM, Blogger vasud said…

    Thanks for reading the posts on my blog.

    I agree completely with your views on the role of history in our lives, I seem to have missed those points.

    As for the partition being the need of the time, I do not contradict that either. I look at it as an example where even our so-called rashtrapita could not fathom the intricacies and gravity of the issue in the beginning, when he made the first statement and I think he should have admitted that, especially considering his admirable virtue of admitting mistakes ( which I read in his autobiography).

    Though I agree that the seed of partition was sown long before, I wonder if the efforts to divide India would have been as successful had Barrister Jinnah not been alienated from Congress in the first place. He was the first person to have ridiculed the idea of Muslim league when it was formed.

    Gandhi's inability to appreciate the depth of certain very important issues, and using them for temporary political advantage can be seen in several instances, one particular being his support to Restore Caliphate in Turkey movement, one of the biggest political blunders. It contradicted the very essence of Indian Freedom Struggle, its goal of a democracy in India. Again in his admirable attempt to find support for the freedom struggle among muslims, he ended up opposing secular forces in Turkey, which were fighting the British backed Caliphate (just like the indian freedom struggle).

    The point of my post was the 'awastav' and 'a-wajavi' importance given to Gandhi. Congress deified Gandhi, and then tried to glorify all the mistakes he made as ultra-secular attempts to bring the minorities into main-stream and his penchant for peace. I do not hate gandhi, I hate his followers who are trying to Hog the conncept of Secularism based on his deification. I don't know if you have read The Da Vinci Code. Just like the Catholic church claims salvation only through subservience to the Church, Congress has been trying to claim that secularism is what congress defines it is, though these days it's very opposite to what it claims. Today every mistake you see Congress making is a consequence of its attempts to glorify Gandhi's mistakes. To draw a parallel, today's pseudo-secularism shoots from seeds sown by our rashtrapita!

     
  • At 10:55 AM, Blogger Manatla Kahi... said…

    नमस्कार,

    मी ’बाप’ हा लेख पूर्वी वाचला होता. आपल्या blog वर तो पुन्हा वाचला. मला तो लेख वाचताना असं जाणवलं होतं की प्रस्तुत लेखाचा उद्देश हा वडील हे आईपेक्षा श्रेष्ठ आहे असा नसून लेखकाला एवढंच म्हणायचं आहे की आईवर आजवर खूप साहित्य निर्माण झालंय पण त्यामानाने वडीलांवर फार साहित्य निर्माण झालं नाहीये. अलिकडे कुठल्याशा वर्तमानपत्रात फादर्स डे निमित्ताने बर्‍याच लोकांनी त्यांच्या वडीलांवर खूप छान लेख लिहिले होते. त्याव्यतिरिक्त माझ्या महितीत असलेली वडीलांवर लिहिलेली १-२ पुस्तके वगळता वडीलांवरचे इतर साहित्य मला तरी माहित नाही. असो...

    तरीसुद्धा प्रस्तुत लेखामधे काही ठिकाणी आई-वडीलांची तुलना केली गेली आहे. ती नसती तर लेखाचा मूळ उद्देश अधिक साध्य झाला असता असे वाटते.

    शेवटी सांगावसं वाटत की आपण जे काही लिहिलय ते छानच आहे.

     

Post a Comment

<< Home